🌟 पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या यशस्वी सफलते नंतर दुसरी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली.
🌟 कालावधी - 1 एप्रिल 1956 - 31 मार्च 1961
🌟 राष्ट्रीय विकास परिषदेने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला 2 मे 1956 रोजी मान्यता दिली .
🌟 अध्यक्ष - पंडित जवाहरलाल नेहरू
🌟 उपाध्यक्ष - टी. टी. कृष्णम्माचारी
🌟 प्रतिमान - पी. सी. महालनोबीस ( प्रशांत चंद्र महालनोबिस )
🌟 मुख्य भर - उद्योग ( भांडवली, मूलभूत आणि अवजड उद्योग )
🌟2 ऱ्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे -
- राष्ट्रीय उत्पन्नातील वार्षिक वृद्धी लक्ष्य - 4.5 %
- राष्ट्रीय उत्पन्नातील वार्षिक वृद्धी साध्य - 4.2 %
🌟 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील सार्वजनिक खर्च -
1) दळणवळण - 28%
2) उद्योग - 24 %
3) कृषी आणि सिंचन - 20 %
🌟 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकूण सार्वजनिक खर्च 4800 कोटी रुपये इतका लक्षित होता परंतु प्रत्यक्षात तो 4673 कोटी रुपये इतका झाला.
🌟 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये चलनवाढीची समस्या आढळून आली .
🌟 1960-1961 मध्ये चलनवाढीचा दर 6.6% इतका होता
🌟 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्याचे एकूण 82 मिलियन टन इतके उत्पादन झाले.
🌟 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील महत्त्वाच्या घडामोडी -
1) योजने दरम्यान महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली .
🌟 विकास प्रकल्प -
1) दुसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान 30 एप्रिल 1956 भारताचे दुसरे औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले .
2) Bharat Heavy Electricals Limited ( BHEL) - हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला
3) 1 मार्च 1958 ला अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली
4) पंजाब मधील नांगल येथे खत कारखाना
5) रूरकेला येथे खत कारखाना
6) भिलाई लोह पोलाद उद्योग
7) दुर्गापूर लोह पोलाद उद्योग
8) रुरकेला लोह पोलाद उद्योग
9) दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1 सप्टेंबर 1956 ला भारतीय जीवन विमा निगम (Life insurance Corporation of India) ची स्थापना करण्यात आली.
🌟 FAQ ....
1) दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते ?
- दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते .
2) दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष कोण होते ?
- दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष टी. टी. कृष्णम्माचारी हे होते .
3) एलआयसी ची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजने दरम्यान झाली ?
- LIC ची स्थापना दुसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान झाली
4) कोणत्या पंचवार्षिक योजने दरम्यान महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली ?
- दुसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली
5) दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान कोणते ?
- दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे महालनोबिस हे प्रतिमान होते
0 टिप्पण्या